

Contents
- 1 ‘आप’ ने शंभर कोटींच्या रस्त्यांचा केला पंचनामा : गटार चॅनेल गायब ! महापालिकेकडे एकही तपासणी अहवाल नाही !
‘आप’ ने शंभर कोटींच्या रस्त्यांचा केला पंचनामा : गटार चॅनेल गायब ! महापालिकेकडे एकही तपासणी अहवाल नाही !
आप पदाधिकारी कोल्हापूर यांच्याकडून गुरुवारी होणार कोअर टेस्ट तर शनिवारी बैठक !
(संदिप देसाई , ‘आप’ , प्रदेश संघटन सचिव, पश्चिम महाराष्ट्र , यांच्याकडून बातमी )
‘आप’ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत कोल्हापूर येथे शंभर कोटींच्या रस्त्यांचा केला पंचनामा केला आहे. यात गटार चॅनेल गायब असल्याचे दिसुन आले आहे. कोल्हापूर महापालिकेकडे एकही तपासणी अहवाल नाही. ‘आप’ पदाधिकारी कोल्हापूर यांच्याकडून गुरुवारी कोअर टेस्ट होणार आहे. तर शनिवारी बैठक घेतली जाणार आहे.
‘आप’ ने केला पंचनामा. …
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला. या निधीतून पाच रस्त्यांचे काम सुरु होते. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. यावर ‘आम आदमी पार्टी’ ने हे काम अपूर्ण असल्याचे सांगत रस्त्याचा पंचनामा करण्याचा इशारा दिला होता.
रस्त्यांचे सॅम्पल महापालिकेत घेऊन जाण्याचा इशारा. ..
‘आप’ चे पदाधिकारी पोहचल्यानंतर फक्त शाखा अभियंता सुरेश पाटील तेथे होते. तुमचे काय ते निवेदन द्या, आम्ही वरिष्ठाना कळवू असे बोलताच ‘आप’ पदाधिकारी आक्रमक झाले. तुम्हाला पत्र दिले असताना वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार, क्वालिटी कंट्रोल व डिझाईन कन्सलटंट अनुपस्थित का? असा सवाल करत, ‘आप’ चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी संबंधित अधिकारी न आल्यास फावडा कुदळ घेऊन रस्त्याचे सॅम्पल महापालिकेत घेऊन जाण्याचा इशारा दिला. पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना बोलावून घेतले.
यानंतर ‘आप’ पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. रस्त्याच्या सर्व तपासण्यांचा अहवाल मागितल्यानंतर अधिकारी निरुत्तर झाले. अजून अहवाल उपलब्ध नाही, उपलब्ध करून देतो अशी उत्तरे दिली. रोड क्रॉस सेक्शन प्रमाणे काम का केले नाही, एस्टीमेट मध्ये गटार चॅनेल पडदी नमूद असताना प्रत्यक्षात गटार का गायब आहे, रस्ता आधी आणि चॅनेल नंतर असे बांधकाम केल्यास रस्त्याची लेव्हल बिघडून रस्ता खराब झाल्यास अधिकारी जबादारी घेणार का असा सवाल देसाई यांनी केला. रस्त्याचे सर्व अहवाल व कोअर काढण्याची मागणी त्यांनी केली.
आंदोलनाचा इशारा. ….
यावर शहर अभियंता सरनोबत यांनी रस्ते करण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी राहिले असल्यास त्या सुधारू, गुरुवारी संयुक्त पाहणी करून कोअर काढून घेतो असे आश्वासन दिले. तसेच रस्ते कामाच्या संबंधित सर्व कन्सलटंट यांची शनिवारी बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत सर्व अहवाल सोबत घेऊन यावेत अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा देसाई यांनी दिला.
यावेळी उपशहर अभियंता आर के पाटील, शाखा अभियंता सुरेश पाटील, आप शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मयुर भोसले, प्राजक्ता डाफळे, दुष्यंत माने, डॉ. कुमाजी पाटील, रवींद्र राऊत, राजेश खांडके, संजय नलवडे, शुभंकर व्हटकर, रमेश कोळी, अमरसिंह दळवी, गणेश मोरे, दिलीप पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
आम आदमी पक्षात राष्ट्रीय पक्ष…
‘आप ‘ अर्थात आम आदमी पार्टी हा पक्षाचे देशातील एक महत्वाचा राजकिय पक्षाचे आहे.या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देखील मिळालेला आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक श्री.अरविंद केजरीवाल हे दिल्ली चे मुख्यमंत्री आहेत.ते वादग्रस्तपणे आज तुरूंगात आहेत .त्यांच्यावर केंद्रातील मोदी सरकारने ई डी च्या माध्यमातुन आरोप करत अटक करून तुरुंगात डांबले आहे.पण अरविंद केजरीवाल व त्यांच्या पक्षाला हे आरोप मान्य नसुन त्यांना राजकिय विरोधक म्हणून केंद्रातील मोदी सरकारने तुरुंगांत टाकले आहे, असे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुक प्रचारासाठी तुरूंगातून सोडलेही होते.त्यानंतर त्यांनी देशभर प्रचार सभांमधे मोदी सरकारवर टीका केली होती.जनमत देखील त्यांच्या बाजुने उभे राहिले होते. एवढेच नाही तर विदेश व संयुक्त राष्ट्र संघटनेने या निर्णयावर मोदी सरकारवर टीका केली होती. निवडणुक प्रचारानंतर श्री.अरविंद केजरीवाल यांनी कायद्याप्रमाणे परत तुरुंगांत जाणे,योग्य ठरवून न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरवले आहे.
अपुर्ण व दर्जाहिन काम? ….
‘आप’ चे कार्यकर्ते मात देशभर काम करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पार्टीच्या कोल्हापूर येथील त्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी कोल्हापूरात नेतृत्व करत कोल्हापूर येथे कोल्हापूर महापालिकेकडून सांगण्यात येत असलेल्या 100 कोटींच्या रस्त्यांचा कामांना आक्षेप घेत आंदोलन सुरू केले आहे. त्यांचा रस्त्याच्या कामांच्या दर्जा व पुर्णता यांवर आक्षेप घेतले आहेत. प्रशासनाच्या व राजकिय लोकप्रतीनिधींच्या काम करण्याची पद्धत जी आहे.ती राज्यभर सारखीच आहे.त्यात अपुर्ण व दर्जाहिन काम केले जाणे ही बाब सार्वत्रिक आहे.मात्र या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष काम केल्याचा महापालिकेने केलेला दावा तपासुन पाहण्यासाठी त्या रस्त्यांचा ‘पंचनामा’च करुन ‘दुध का दुध आणि पाणी का पाणी’ करण्याचे ठरवलेले दिसते.