Contents
- 1 शिरुर तालुक्यात तिसरा खुन ? कायदा व सुव्यवस्था धोक्यात ?
- 1.1 शिरुर तालुक्यात तिसरा खुन ? एम आय डी सी रांजणगाव परिसर व शिरुर शहरात का वाढतोय हिंसाचार?
- 1.2 • आरोपी—-
- 1.3 • घटनांची पार्श्वभूमी :
- 1.4 • छाप्याची कामगिरी :
- 1.5 • कायदेशीर कारवाईचे तपशील :
- 1.6 • कुशल तपास आणि अधिकाऱ्यांचा सहभाग :
- 1.7 • गुन्हेगारांचा मनोबल खच्चीकरण :
- 1.8 • सामाजिक संदर्भ व प्रभाव :
- 1.9 • पोलिसांची आवाहन व पुढील पाऊल:
- 1.10 • जिल्ह्यतील शांतता व कायदा सुव्यवस्था रक्षण:
- 1.11 • पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग :
- 1.12 • गुंतागुंतीच्या तपासाचे आव्हान :
- 1.13 • मीडिया व जनसंपर्क :
- 1.14 • शहरातील सुधारित सामाजिक वातावरण :
- 1.15 • नागरिकांची जबाबदारी :
- 1.16 • पोलिस प्रशासनाची आश्वासने :
- 1.17 • निष्कर्ष :
शिरुर तालुक्यात तिसरा खुन ? कायदा व सुव्यवस्था धोक्यात ?
शिरुर तालुक्यात तिसरा खुन ? एम आय डी सी रांजणगाव परिसर व शिरुर शहरात का वाढतोय हिंसाचार?
शिरुर,दिनांक १० ऑक्टोबर २०२५|प्रतिनिधी|
शिरुर शहरात पोलिसांच्या कारवाई नुसार दिनांक ८/१०/२०२४ रोजी सकाळी पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने कार्यक्षमता दाखवत जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून तरुण संतोश मारुती ठोबळे,वय- २० वर्षे,राहणार-वाडा कॉलनी, शिरुर, ता.शिरुर,जि.पुणे याच्या खुनातील गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विरुद्ध मोठी कारवाई केली. पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासमोहीम राबवली गेली. अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येताना रणनीती आखली.त्या अंतर्गत आरोपीकडे साईनगर, शिरुर येथे छापा टाकण्यात आला. या छाप्यात गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
• आरोपी—-
1.सचिन विलास मांबडवार,वय- २४ ,सिद्धार्थ नगर,शिरुर, ता.शिरुर,जि.पुणे.
2.यश महेश मांदिलकर,वय- २०,साईनगर, शिरुर,ता.शिरुर, जि.पुणे.
3.विधीसंवर्धित
• घटनांची पार्श्वभूमी :
दिनांक 8//१०/२०२४ रोजी शिरुर शहरात यातील दोन आरोपींनी जुन्या भांडणाचा वाद ताणून मोठ्या गुन्हयाला अंजाम दिला.मृत ढोबळे याला प्रकाश धाडीवाल याच्या जागेजवळ बोलावुन घेतले.तेथे तोंडावर व डोक्यावर प्रहार करुन ठार केले.याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कायदा कलम १०३,(५),३(५) या कलमान्वये वरील आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यावरून पोलिसांनी पूर्ण क्षमतेने तपास सुरू केला आहे.
• छाप्याची कामगिरी :
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ८/१०/२०२४ रोजी ठरावीक पथक नियोजनपुर्वक छाप्यासाठी पाठवले. आरोपीच्या जवळील गुन्ह्यात वापरलेली शत्रे हस्तगत करण्यात आली.आरोपी साईनगर,शिरुर येथे असल्याची खात्री झाली.नंतर त्यांना बेमालुमपणे छापा टाकून अटक केली गेली आहे.या घटनेनंतर शहरच नाही तर पुणे जिल्हा हादरला होता.कारण एकाच आठवड्यात यश इन चौक,एम आय डी सी येथे एक व पुढे एक असे दोन खुनाचे प्रकार घडले होते..
• कायदेशीर कारवाईचे तपशील :
आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे.या आरोपींला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ न्यायालयाने दोन आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.तर विधीसंवर्धित आरोपीला पुणे येथील रिमांड होममधे पाठवण्यात आले आहे. ही पोलिस करत असलेली तात्काळ कारवाई शिरुर शहर,तालुका व पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीला लगाम घालणारी आहे.
• कुशल तपास आणि अधिकाऱ्यांचा सहभाग :
या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली ,सहाय्यक निरीक्षक श्री. शुभम चव्हाण,उपनिरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर,पोलिस निरिक्षक सागर शेळके, पोलिस हवालदार सचिन भोई, विजय शिंदे , नितीन सुद्रिक,परशराम सांगळे,अक्षय कळमकर, नितेश थोरात, निखिल रावडे,नीरज पिसाळ,अंबादास थोरे,रविंद्र काळे,अजय पाटील, वैभव शेलार, तुषार पंधारे ,स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, जनार्दन शेळके, राजु मोमीन,संजु जाधव,सागर धुमाळ यांचा सहभाग आहे. सर्वांनी दिवसरात्र मेहनत , गुप्तवार्ता संकलन,सी सी टी व्ही फुटेज इ.वापरुन छापा टाकला.आरोपींना कानोकान खबर न लागु देता,साईनगर, शिरुर मधून अटक केली.
• गुन्हेगारांचा मनोबल खच्चीकरण :
जुन्या भांडणामुळे मनात राग ठेवून स्थानिक सशस्त्र टोळी तयार करून दहशत व गुन्हेगारीला खतपाणी देणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी घातलेली टाच आणि त्यानंतर मिळवलेली यशस्वी कारवाई पोलिस दलाच्या कार्यक्षमतेला साक्ष देते. या घटनांमुळे स्थानिक गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे.पण हिंसकता जी आढळून येते.ती यापूर्वी नव्हती.
• सामाजिक संदर्भ व प्रभाव :
या घडलेल्या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाला होता व आहे.तरी पोलिस प्रशासन आपली सुरक्षा व कायद्यानियम राबवण्यासाठी तत्पर व दक्ष आहे.हे ही सुचित झाले आहे. मात्र नागरिकांनी भवताली लक्ष ठेवणे असते.मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. अशा मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसेल, असे नागरिकांचे मत आहे.आशा आहे.
• पोलिसांची आवाहन व पुढील पाऊल:
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही शंकास्पद व्यक्ती, शस्त्रद्वारे धमकी अथवा कुठल्या प्रकारचा वाद निर्माण झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिस दलाने पुढील तपास अधिक जोरात सुरू ठेवून आरोपीच्या इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्याचे ठरवले आहे.इतर सर्व शक्यता पाडताळुन पाहिल्या जात आहेत.
• जिल्ह्यतील शांतता व कायदा सुव्यवस्था रक्षण:
ही घटना एक निवडक नसून, जिल्ह्यतील सर्वच पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियमितपणे तपास व कारवाई करतात. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही.अशी आशा व्यक्त केली जात आहे.
• पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग :
जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सर्व सदस्यांनी संघटित मेहनत व एकसंधता दाखवत ही कारवाई केली.
• गुंतागुंतीच्या तपासाचे आव्हान :
या कारवाई दरम्यान आरोपीचे विविध सामाजिक संबंध, मोबाईल वापर, सिमकार्डची बदलती मालकी आणि इतर लोकांशी संपर्क आढळून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली होती. या तपासात आधुनिक साधनांचा वापर, स्थानिक गुन्हे शाखेचा सहकार्य, गुप्त माहितीचे संकलन, समुपदेशन पद्घतींचा अवलंबही केला जात आहे.
• मीडिया व जनसंपर्क :
ही माहिती प्रसारमाध्यमांद्वारे पत्रकारपरिषदेत सांगण्यात आली. या प्रसंगाला स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, इतर अधिकारी उपस्थित होते. अनेकांचा विश्वास आहे की, भविष्यात अशा संयुक्त कारवाया सातत्याने होण्याची गरज आहे.
• शहरातील सुधारित सामाजिक वातावरण :
या घटनेने पुन्हा एकदा समाजात कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता निर्माण झाली आहे. गुन्हेगारीच्या छायेत दहशतीचं वातावरण वारंवार तयार होत असते. त्यावर पोलिसांनी केलेला हा धाडसी तपास समाजाला दिलासा देणारा आहे.
• नागरिकांची जबाबदारी :
शहरातील प्रत्येक जबाबदार नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्तीं पासून स्वतःचा आणि समाजाचा बचाव करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
• पोलिस प्रशासनाची आश्वासने :
पोलीस प्रशासनाच्या वतीने असा इशारा देण्यात आला आहे की, यापुढे देखील कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगारीला स्थान नाही. कारवाई न थांबता सातत्याने सुरू राहील आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळेल.
• निष्कर्ष :
गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीविरुद्ध पोलिसांमधून झालेल्या वेगवेगळ्या मोठ्या अभियानांमुळे शहरात शांतता आणि सुरक्षिततेचा अविष्कार झाला आहे.हे ही खरे आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.यातही तथ्य आहे. कायद्यानुसार समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती, दहशत अथवा अनुचित प्रकार पोलिसांच्या करडी नजरेतून सुटणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
