Contents1 सैफ अली खान ‘पटौदी’ याच्या ‘खानदानी’ चा ‘सत्यशोधक’ वृत्तांत वाचा..1.1 सैफ अली खान प्रकरणामध्ये आता करीना कडे नजरा वळल्या?1.1.1 शिरुर, दिनांक 27 जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज , संपादकीय)1.1.2 सैफ अली खान पटौदी संस्थान चा मुळ पुरुष व ठिकाण–1.1.3 सैफ अली खान ‘पटौदी संस्थान ‘ आणि अँग्लो मराठा वार !1.1.4 सैफ अली खान पटौदी घराण्याची मालमत्ता—-1.1.5 पटौदी संस्थानाचे भारतात विलीनीकरण कोनत्या परिस्थितीत ?1.1.6 सैफ अली खान पटौदी घराणे आणि त्यातील वंशजांची लग्ने !1.1.7 एनीमी प्रॉपर्टी ऍक्ट 2014 :1.1.8 मध्य प्रदेश हायकोर्टाची नोटीस ;1.1.9 सैफ अली खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली होती भेट !1.1.10 सैफ अली खान फिल्म करिअरमध्ये अपयशी ;1.1.11 मुंबई पोलिस रडारवर ?1.1.12 About The Author1.1.12.1 Dr.Nitin Pawar1.1.13 ❤️ Support Satyashodhak Blog सैफ अली खान ‘पटौदी’ याच्या ‘खानदानी’ चा ‘सत्यशोधक’ वृत्तांत वाचा.. सैफ अली खान प्रकरणामध्ये आता करीना कडे नजरा वळल्या? शिरुर, दिनांक 27 जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज , संपादकीय) (Thanks to Wikipedia for Images in this content. ) सैफ अली खान ‘पटौदी’ याच्या खानदानी चा ‘सत्यशोधक’ वृत्तांत वाचा सविस्तर या लेखनामधे ! सैफ अली खान प्रकरणामध्ये आता करीना कडे नजरा वळल्या आहेत ? अशी ताजी चर्चा माध्यमांमधे व लोकांमधे का सुरु झाली आहे? याचा काही अंदाज लावण्याचा प्रयत्न चुकीचा ठरणार नाही ! सैफ अली खान पटौदी संस्थान चा मुळ पुरुष व ठिकाण– इफ्तिकार अली खान सैफ अली खान पटौदी हे घराने मुळचे अफगाणिस्तान मधील आहे . ‘पश्तुन‘ भागामध्ये एक ‘बरेच‘ नावाची जमात राहते. त्या जमातीचे हे वारसदार आहेत अशी माहिती उपलब्ध होत आहे. साधारणपणे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेच्या आसपासचा भाग आहे.तेथुनच थोडे पुढे समरकंद आहे. तेथील तैमुर लंग हा लुटारु भारतात येवुन लुट करुन गेल्याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. हा लंगडा होता म्हणे ! परंतु तो सुलतान किंवा राजा बनला. सैफ अली खान याने आपल्या मुलाचे नाव ‘तैमुर‘ असे ठेवलेले आहे ! दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर असे आहे जहांगीर हा मुघल घराण्यातील एक शासक होता.ही नावे निवडण्याचे अर्थात स्वातंत्र्य सैफ अली खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना आहे. सैफ शब्दाचा अर्थ तलवार असा होतो. म्हणजे हा क्षत्रियांमध्ये असतो तसा युद्धासंबंधी व लढवय्यांसंबंधी असलेला अभिमान किंवा अस्मिता वगैरे असते तसा आहे. याला ‘सामंतवादी मानसिकता‘ असेही समाजवादी किंवा मार्क्सवादी म्हणून शकतात. तर या भागातून हे घराणे भारतामध्ये आले. Read more >> सैफ अली खान रिक्षाचाकल भजन सिंग राणाला संकटकाळी मदत केली म्हणुन नवीन रिक्षा बक्षिस देणार ? सैफ अली खान ‘पटौदी संस्थान ‘ आणि अँग्लो मराठा वार ! अंग्लो मराठा वार ! एक दुर्मिळ चित्र . तर भारतावर शासन करणारे परकीय इंग्रज आणि भारतामध्ये त्यावेळी अस्तित्वात असणारे ‘मराठा एम्पायर‘ यांच्यामध्ये एक महत्त्वाची लढाई 1818 मध्ये झाली होती. तिला ‘अंगलो मराठा वार ‘ असे म्हणतात. या लढाईमध्ये इंग्रजांच्या बाजूने जे लढले होते, इंग्रजांना ज्यांनी मदत केली होती त्यापैकी एक हे भोपाळ चे पटौदी संस्थान होते अशी नोंद आहे. त्याचे बक्षीस म्हणून इंग्रज सरकारने या घराण्याला ‘नवाब पटौदी ‘ असा किताब दिला. सैफ अली खान पटौदी घराण्याची मालमत्ता—- नुर ए सबाह हॉटेल ,भोपाळ भोपाळ मध्ये नुर ए सबाह हॉटेल पटौदी घराण्याचे आहे. हे अप्रतिम सुंदर असे आहे. करोडो रुपयांच्या मोलाची ते आहे . तसेच गुडगाव हरियाणा व इतरत्र अगणित अशी संपत्ती या घराण्याची आहे. त्रिलोका सफर हॉटेल ,नुर ए सलाद इत्यादी पर्यटकांचे ते आकर्षणाचे केंद्र असते .मोठे मोठे नेते आणि सेलिब्रिटीज ते पाहण्यासाठी जात असतात . एकंदरीत ही 15,000 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे आकडे येत आहेत. अँग्लो मराठा वार च्या वेळेस फैज तलफ खान हे पतौडी पतोडी संस्थान चे प्रमुख होते. त्यांच्यानंतर इफ्तिकार अली खान, मन्सूर अली खान आणि त्यांचा मुलगा सैफ अली खान असा हा क्रम आहे .इफ्तिखार अली खान हे क्रिकेटर होते. ते भारत आणि इंग्लंडच्या बाजूने क्रिकेट खेळले. त्यावेळेस भारत इंग्रजांच्या ताब्यात होता. इंग्रजांचे राज्य भारतावर होते. मन्सूर अली खान हे ही क्रिकेटर होते .ते भारतीय संघातून क्रिकेट खेळलेले आहेत. Read more >> रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 मुद्यांवर मिटिंग: कोनत्या ते वाचा…. पटौदी संस्थानाचे भारतात विलीनीकरण कोनत्या परिस्थितीत ? सरदार वल्लभभाई पटेल भारताच्या स्वातंत्र्यानंतर पटौदी संस्थान हे पाकिस्तान मध्ये सामील होण्याच्या मानसिकतेचे होते. त्याला मेवाड संस्थानाने विरोध केला .त्याच वेळेस दिल्लीमध्ये या संस्थानांमध्ये लोकांवर हल्ले सुरू झाले होते .त्यामुळे त्या वेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी नबाबाला भारतामध्ये संस्थान विलीन करण्याची सूचना दिली .आणि ते भारतामध्ये विलीन झाले. भारतामध्ये विलीन झाल्यानंतर अशा संस्थांनांना तनखा म्हणजे पेन्शन सारखे असे काही वेतन त्यांच्या खर्चासाठी दिले जात असे.मात्र त्यांची संस्थांने भारत सरकारने ताब्यात घेतलेली होती. नबाब रायबहादुर वगैरे सारखी जी पदे होती ती 1971 साली इंदिरा गांधी यांनी नष्ट केली. त्याबाबत जयपूरची महाराणी हिने इंदिरा गांधींकडे तक्रार केल्याची नोंद आहे. 1949 साली या संस्थानाचा विलय भारतामध्ये झाला होता. सैफ अली खान पटौदी घराणे आणि त्यातील वंशजांची लग्ने ! करीना कपूर खान बबीता आणि रणधीर कपूर हे करीना कपूरचे वडील आई आहेत .अमृता सिंग ही त्याची आधीची पत्नी आहे. या आधीच्या लग्नामध्ये करीना कलवरी म्हणून उपस्थित होती नंतर त्याची पत्नी बनली. शर्मिला टागोर ही रवींद्रनाथ टागोर यांच्या घराण्याशी जवळीक असलेली अभिनेत्री होती .पण नेमकी कोणते नाते होते ? हे काही माहित नाही. मन्सूर अली खान पटौदी आणि शर्मिला टागोर यांचे लग्न झाले .सैफ अली खान हा त्यांचा मुलगा . सैफ अली खानचे आधी अमृता सिंह या हिंदी अभिनेत्री शी लग्न झालेले होते. नंतर अमृता सिंग च्या मते फक्त ‘जिसम‘ साठी सैफ अली खानने हे दुसरे लग्न केले आणि अमृता सिंह हिला धोका दिला . एनीमी प्रॉपर्टी ऍक्ट 2014 : तर हमीद उल्ला खान हे भोपाळचे नवाब होते त्यांना दोन मुली होत्या. त्यातील एक हमिदा पाकिस्तान मध्ये गेली. तेथे तिचा एक मुलगा पाकिस्तानी लष्करात मोठ्या पदावर काम केलेला आहे. लहान मुलगी साजिदा हिचा विवाह इफ्तकार अली खान यांच्याशी झाला.परंतु त्यांना मुलगा नव्हता.पण जी हमिदा पाकिस्तान मध्ये गेली ती देखील एक हकदार आहे. तिने तिचा हक्क सोडणे व संपत्ती बहिणीकडे सोपवणे असे काही कायदेशीरपणे झाले नाही. संपत्ती इफ्तिखार अली खान यांच्याकडे आली. पण यामध्ये प्रॉपर्टी डिस्प्युट निर्माण झाला .त्यामुळे सरकारचा हस्तक्षेप झाला .कायद्याचाही या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप झाला. मध्य प्रदेश सरकारने ही संपत्ती मध्य प्रदेश सरकार कडे सामील होईल अशी नोटीस दिली. 2015 त्यानंतर कोर्टामध्ये शर्मिला टागोर आणि सैफ अली खान यांनी प्रयत्न केले . 2014 साली या कायद्यात परिवर्तन केले गेले. मध्य प्रदेश हायकोर्टाची नोटीस ; सैफ अली खान मध्यप्रदेश सरकारने सैफ अली खान यांना ही संपत्ती मध्य प्रदेश सरकार मध्ये सामील करण्याची नोटीस दिल्यानंतर सैफ अली खान हे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. हल्ल्याच्या दोन-तीन दिवस आधी मध्य प्रदेश हायकोर्टचे अग्रवाल यांनी या सरकारच्या निर्णयाला स्टे आणला . 30 दिवसांच्या आत आपला हक्क सिद्ध करण्याची नोटीस दिली . त्यानंतर हा प्रसंग उद्धवलेला आहे. अशा प्रकारची प्रॉपर्टी असेल तर त्यासाठी एनीमी प्रॉपर्टी अक्ट हा कायदा आला होता. आणि अशी संपत्ती सरकार जमा या कायद्यानुसार होणार होती. या 15,000 कोटी रुपयांच्या मालमत्ते चे टेन्शन सैफ अली खान परिवारातील सर्वांना असणे आणि तणावाचे वातावरण असणे ,निर्माण होणे ही बाब सहज आहे.अलीकडच्या काळात सैफ अली खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सैफ अली खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली होती भेट ! या भेटीनंतर सैफ अली खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक उद्गार काढताना असे म्हटले की हे भारताचे पहिले असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी ‘ मेरी आखो मे आके डालकर बात की’ त्यानंतर हा हल्ला झाला.हा किती सिरीयस होता? घरातील लोकांसह आणि घराबाहेरील लोक यांचा सहभाग आहे का ? हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. सैफ अली खान फिल्म करिअरमध्ये अपयशी ; सैफ अली खान ची एकही फिल्म आजपर्यंत झालेली हिट नाही . आता नुर ए सभा ची संपत्ती देखील सैफ अली खान वाचवु शकतो की नाही ? याची शंका आहे. आता झालेल्या हल्ल्याचा आणि या प्रॉपर्टीच्या वादाचा काय संबंध आहे का ? या अँगलमधून देखील या विषयाकडे तपासण्याची गरज आहे .वरील माहिती नुसार सध्याच्या घटनेचे टाइमिंग देखील विचारात घेतलेले पाहिजे. घटनाक्रम लक्षात घेतला पाहिजे. मुंबई पोलिस रडारवर ? डॉक्टरने सांगितलेली माहिती आणि गंभीर स्वरूपाच्या ऑपरेशन होणे. परंतु त्याचबरोबर डॉक्टरनी वापरलेला ‘शेर‘ असा शब्द आणि ऑपरेशन झाले त्या वेळेचा ऑपरेशनचा पेशंट सहा दिवसात एकदम ओके आणि वाघाच्या चालीने चालतो .आपल्या फॅन्सला हात करतो. वगैरे बऱ्याच थिअरीज सांगितल्या गेल्या. मुंबई पोलिसांनी वेगवेगळे रिपोर्ट दिले. आज घडीला बातमी अशी येत आहे की अटक करणाऱ्या आरोपींचे फिंगरप्रिंट्स हे जुळलेले नाहीत. आणि सैफ अली खान आणि करीना कपूर ,त्याची पत्नी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले .आणि या भांडणातून करीनाने सैफ अली खानवर अशा प्रकारचा हल्ला केला असावा. असा सूर त्यातून उमटतो आहे. कारण करीना कपूर त्यावेळेस खूप नशेमध्ये होती. ती त्याच्याबरोबर दवाखान्यामध्ये गेली नाही. तर आपली बहीण करिष्मा हिच्याकडे गेली. वगैरे जी माहिती येत होती तिच्या तफावत आणि बयानांमधे मध्ये तफावत दिसून येत आहे. एकंदरीत हा हल्ला सैफ अली खान कुटुंबीयांच्या आतीलच एक घटना असावी .असा लोकांचा दृढ समज व्हायला लागला आहे. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन ‘कराड प्रवृत्ती’ बीड जिल्ह्यापूर्ती मर्यादित आहे का? Online Exercise आनलाईन व्यायाम आता शक्य झाला आहे ? होय ! कसे ते वाचा सविस्तर !